अग्रीमा जोशुआ व सौरव घोष-छत्रपती शिवाजी महाराज नावावरून चाललेले 1 प्रकरण

शिवप्रेमींनो, गेल्या २-३ दिवसापासून सोशल मीडियावर आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकेरी नावावर सुरू झालेले स्टँड-अप कॉमेडियन अग्रीमा जोशुआ व सौरव घोष प्रकरण पाहतो आहे. त्याबद्दलचा हा लेख आहे.


शिवप्रेमींनो, तुमच्यापैकी किती लोक या प्रकरणापूर्वी अग्रीमा जोशुआ व सौरव घोष यांना ओळखत होतात? मी तरी या दोघांचे नाव पहिल्यांदाच ऐकतोय. हल्ली एक समाजात ट्रेंड सुरू झालाय!

जर एखाद्या व्यक्तीला प्रसिद्ध व्हायचे असेल तरर खूप प्रयत्न करूनही चांगल्या कर्तृत्वाने तो होत नसेल तर् तो असे मार्ग अवलंबतो.आणि आपली ओळख तयार करतो.

त्यामुळे अशा लोकांकडे लक्ष न देणेच योग्य आहे. यांची लायकी पण नाही महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा अनादर करण्याचा! आणि आपण अशा लोकांकडे लक्ष न देणेच चांगले आहे. कारण यामुळेच ह्या हरामी लोकांचे फावते व प्रसिद्ध होतात.


परवा कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज छत्रपती संभाजीराजे यांना अजित पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये ३ऱ्या रांगेत स्थान दिल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. परंतु छत्रपती संभाजीराजे यांनी अगदी नम्रतेने म्हंटले होते की, मी एक सामान्य नागरिक म्हणून आलेलो आहे.

हेच असते खरे शिवभक्त! आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कर्तृत्वात आहे, हेच दाखवण्याची आता वेळ आली आहे. अशा अग्रीमा जोशुआ व सौरव घोष सारख्या लोकांकडे लक्ष न देणेच काळाची गरज आहे.

शिवप्रेमींनो, आपले याबद्दल काही वेगळे मत असेल, तसेच आपला या प्रकरणावर पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल, तर आम्हाला आपले मत कंमेन्ट करून नक्की कळवा.
जय जिजाऊ! जय शिवराय!जय शंभूराजे

6 thoughts on “अग्रीमा जोशुआ व सौरव घोष-छत्रपती शिवाजी महाराज नावावरून चाललेले 1 प्रकरण”

    1. Sagar jarbandi

      हो पण या कर्त्यान कडे दुर्लक्ष केलं तर पुढच्या पिढीला आपल्या देवान बद्दल आपल्या महाराजांबद्दल आदर कसं द्यायचं त्यांच्याबद्दल काय कस बोलायचं हे त्यांना कळाव

    1. राज मोहन

      अशा लोकांकडे आवर्जून लक्ष दिले पाहीजे त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी. स्थानिकांनी वेळीच लक्ष न दिल्याने मुंबईची बाहेरच्या लोकांनी वाट लावली.

  1. हो पण या कर्त्यान कडे दुर्लक्ष केलं तर पुढच्या पिढीला आपल्या देवान बद्दल आपल्या महाराजांबद्दल आदर कसं द्यायचं त्यांच्याबद्दल काय कस बोलायचं हे त्यांना कळाव

  2. अशा लोकांना विनाकारण प्रसिद्धी मिळवून देणे हे चूक आहे पण यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे ही काळाची गरज आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!